राज्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असताना या कोरोनाला आला घालण्यासाठी राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समस्यांसाठी आता भाजप नेत्या रोहिणी खडसे पुढे सरसावल्या आहेत. या अधिकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले.
कोविड-19 सारख्या साथउद्रेकात स्वत:चा जीव धोक्यात घालुन तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा करत आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या लेखशिर्षकांवर निधी उप्लब्ध नसल्याने राज्यातील या कोविड योध्दांचे मागिल 4-5 महिन्यांचे मासिक मानधन / वेतन देण्यात आलेले नाही, त्यात उदाहरण द्यायच झाल तर जळगाव 4-5 महिन्यांपासुन, सोलापुर-जालना-पुणे-चंद्रपुर-नासिक-बुलढाणा या सर्वच जिल्ह्यांमध्ये 3-4 महिन्यांपासुन वेतन देण्यात आलेले नाही, त्यामुळे शासनाने प्राधान्याने व तात्काळ निधी उप्लब्ध करुन राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा कराव, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच शासकीय सेवेत येणारे एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे स्वरुप व जोखिम सारखीच असते परंतु, एम.बी.बी.एस. आर्हताधारक कंत्रांटी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे बी.ए.एम.एस.आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानधन/वेतन वाढ देण्यात आलेली नाही ती देण्यात यावी असे हि या निवेदनात म्हटले आहे.