मुंबई : देशातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली असून, दररोज 15 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड देखील उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेला सामाजिक बांधिलकीचा विसर पडलाय की काय?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत विचारला आहे.
शिवसेनेला सामाजिक बांधिलकीचा विसर पडलाय की काय? राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली आहे, निष्पाप रुग्णांचे जीव जात आहे, तरीही हे सरकार झोपेत आहे. #uddhavthackeray #shivsena #cmomaharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 14, 2020
प्रवीण दरेकर यांनी ट्विट केले की, शिवसेनेला सामाजिक बांधिलकीचा विसर पडलाय की काय? राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली आहे, निष्पाप रुग्णांचे जीव जात आहे, तरीही हे सरकार झोपेत आहे.
दरम्यान, याआधी प्रवीण दरेकरांना राज्य सरकारवर आरोप केला होता की, सगी लॅबशी संगनमत करून राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे