अहमदनगर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. मात्र सोनिया गांधींच्या या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले असून, ‘सत्तेसाठी काँग्रेस लाचार झाली असून, काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाची दिशाभूल केली’, असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम होता. यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्तेरसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले आहे, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
विखे पाटील म्हणाले की, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्कारुन केंद्रीय नेत्यांची कशी फसवणूक केली हेच यातून स्पष्ट होत आहे. एक वर्षाच्याा कार्यकाळात या सरकारने फक्त घोषणा केल्या, खोटी आश्वा्सने दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील प्रतिक्रिया व्यक्त होतील आणि भाजपला जनाधार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.