मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून, दररोज कोरोनारुग्णांचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र लवकरच ठाकरे सरकारद्वारे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली जाऊ शकते.
संपूर्ण लॉकडाऊन लावावा की नाही, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर टास्क फोर्ससोबत देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र अद्याप लॉकडाऊन लावावा की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम ठाकरे सरकारला टोला लगावत ‘आता फक्त कोरोना बरोबर बैठक राहिली आहे’, अशा शब्दात खिल्ली उडवली आहे.
आता फक्त #कोरोना बरोबर बैठक राहिली आहे. @OfficeofUT@rajeshtope11
ती झाली की अंतिम निर्णय होईल #Vasoolisarkar— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) April 12, 2021
आता फक्त कोरोना बरोबर बैठक राहिली आहे. ती झाली की अंतिम निर्णय होईल, असा सणसणीत टोला राम कदम यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनची घोषणा केली जाऊ शकते. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत. तसेच, हा संपूर्ण लॉकडाऊन 8 ते 15 दिवसांची असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक एसओपी तयार करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.