मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
तसेच केवळ काहीतरी घोषणा करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे. अजून परतीचा पाउस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही. धोक्याचा इशारा आहे मात्र पंचनामे सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल असेही आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
‘पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात मदत केल्याशिवाय राहणार नाही’ या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मात्र भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि पंचनामे कधी पर्यंत पूर्ण होतील ते आम्हाला सांगता येणार नाही..’ अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
अतुल भातखळकर यांचे ट्विट –
‘पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात मदत केल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… आणि पंचनामे कधी पर्यंत पूर्ण होतील ते आम्हाला सांगता येणार नाही… तुमची शेती तुमची जबाबदारी… ‘
पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात मदत केल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
आणि पंचनामे कधी पर्यंत पूर्ण होतील ते आम्हाला सांगता येणार नाही… तुमची शेती तुमची जबाबदारी… pic.twitter.com/oFAtEGKC7d— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 20, 2020
Read also :
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रोहित पवारांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी https://t.co/ZlviD1LG6O #DevendraFadanvis #AjitPawar #CMUddhavthackarey #NCP #BJP #Shivsena @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @OfficeofUT @RRPSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020