मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वारंवार विरोधकांकडून मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारले जात आहेत. त्यातच राज्यसभेत कृषी विधेयकावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी एक दिवसांसाठी अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं होतं. याचाच संधर्भ देत भाजपकडून पवार यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाबाबत शरद पवार जाहीर भूमिका का घेत नाहीत असे वारंवार विरोधकांकडून विचारले जाते आता भाजपा नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर टीका केली असून मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर अधिक बरं वाटलं असतं असं म्हटलं आहे.
कृषी विधेयक म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसारख्या नेत्याने विरोधासाठी विरोध करणं शेतकऱ्यांना पटलेलं नाही असं विनोद तावडे यांनी सांगितलं. शरद पवारांना काही बदल सुचवायचे होते तर त्यांनी राज्यसभेत ते मांडणं गरजेचं होतं, सरकारने त्यांचं नक्की ऐकलं असत असंही यावेळी तावडे यांनी सांगितलं.
“मराठा समाजाला कसं डावलायचं हे या सरकारला माहित असून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर अधिक बरं वाटलं असतं,” असा खोचक टोला विनोद तावडेंनी लगावला आहे.
Read Also
काय बोलताय, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? https://t.co/4Us8Zwr16s
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020