नाशिक : सध्या चित्र वेगळं असून देशाची सत्ता मोदींच्या हातात आहे. मोदींची भूमिका ही बोलायची एक आणि करायची दुसरी अशी आहे. तुमच्या भागात पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली का ? आज मोदी साहेबांच्या हाती सत्ता आल्यानंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद थांबली. याचा परिणाम देशाच्या निवडणुका सुद्धा थांबवतील आणि देशाची सत्ता आपल्या मुठीमध्ये घेतील. याने लोकशाही शिल्लक राहणार नाही. तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार उध्वस्त होईल. अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त करत मोदींवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…विधानसभेत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत अटळ, युगेंद्र पवारांकडून तयारी सुरू
पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रधानमंत्री तुमच्या जिल्ह्यात येऊन भाषण करतात की, तुमच्या घरातील सोनं काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिले जाईल. मला समजत नाही, की देशातील कोट्यवधी लोकांच्या घरातलं सोनं कोण काढून घेईल? आणि काढून घेत असेल, कोणी चोरी करत असेल, तर सरकार काय बघ्याची भूमिका घेणार आहे? पोलिस तर यासंबंधीचा काही निकाल देणार नाही? पण लोकांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचा काम त्यांचं आहे. हे सांगताना खूप वेळा समजातील लहान घटकांना, अल्पसंख्याकांना आणखी कसं घाबरून टाकता येईल, अशा प्रकारचा निकाल ते घेतात.
हेही वाचा…“धुळ्यात सुभाष भामरेंचा विजयरथ कॉंग्रेस रोखणार” ? राजकीय गणितं बदलली
ज्यांच्या घरात जास्त मुलं जन्माला येतात, तेच तुमच्या घरातील सोनं घेऊन जातील. ही शुद्ध फसवणुक आहे. अशी एकही गोष्ट याठिकाणी होणार नाही. पण या निमित्ताने महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अपयश मिळाल्यानंतर लोकांचा विचार भलतीकडे वळवायचा, आणि त्यांच्या मनात शंका निर्माण करायची हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचे आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची भाषणं ते करत असतात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” चर्चांना उधाण
हेही वाचा..भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात अटक वॉंरट , प्रकरण काय ?
हेही वाचा…“भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा”, बावनकुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा..“पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असणार, दोन वर्षांनी मोदी रिटायर होतील”