दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारच्या भविष्याबाबत भाजप (BJP) नेत्यानं मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन सरकारनं स्थापन केलेल्या एनएन व्होरा समितीनं दिलेला अहवाल प्रसिध्द होताच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. एनएन व्होरा समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा, अशी मागणी देखी अश्विनी उपाध्यय यांनी केली आहे.
दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार तूतू-मैमै सुरू आहे. मात्र, एनएन व्होरा यांच्या नेतृत्त्वातील समितीनं 100 पानी अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगाराशी देशातील राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधाबाबत खळबळजनक माहिती दडली आहे. मात्र, अद्याप या अहवालाची केवळ 12 पानंच प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित अहवाल कधी प्रसिद्ध केला जाईल, असा सवाल अश्विनी उपाध्यय यांनी एक ट्वीट करून केला आहे.
काय म्हटलं आहे अहवालात?
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव सरकारनं तत्कालीन गृहसचिव एनएन व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयातील सचिवांचाही समावेश होता.
अनेक राजकीय नेते आणि बडे अधिकाऱ्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा दावा या समितीनं दिलेल्या अहवालात केला आहे. एवढंच नाही तर खळबळजनक माहितीही सरकारला दिली आहे. मात्र, 1995 मध्ये या अहवालाची केवळ 12 पानं प्रसिद्ध करण्यात आली होती. उर्वरित पानं अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत.
Read Also :
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…
फटाकेबंदी म्हणजे ‘हिंदू धर्मविरोधी कार्य’, करणी सेनेचा आरोप
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं
..म्हणून ‘या’ कारणामुळे अर्णब गोस्वामीला पोलिसांनी केली होती दिवाळीआधी अटक
मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांकडून नोटीसा