मुंबई : ‘मातोश्री’ वरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी केला आहे.
पूर्वीच्या मातोश्रीवर सर्वांना येण्यास परवानगी होती आता मात्र ‘मातोश्री’वर येऊ देत नाहीत. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासाठी आजचा मोर्चा होणारच. त्यासाठी आम्हाला अटक झाली तरी हरकत नाही पण आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
आज ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका. या मोर्चासाठी प्रतिकात्मक मशालींचा वापर केला जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी 5 वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, ज्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे परंतु आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रक्रिया रखडली आहे, यांच्याबाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या आशा विविध मागण्या असणार आहेत. आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई समन्वयक राजन घाग यांनी ही माहिती दिली.
Read Also –
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘या’ नेत्यांना विधानपरिषदेवर संधी
“राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते यादी नाकारणार नाही”
अखेर यादी समोर आली! महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी ‘या’ 12 नावांचा प्रस्ताव
‘काल निवडून आलेला पोरगा संसदेत 12 वेळा बोलला आणि 3 टर्म खासदार…’ अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला