रत्नगिरी : मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने १४०० एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसंच नाणार रिफायनरी आणि बारसू एमआयडीसीमधील जमीन घोटाळ्यातील नावे जाहीर करणार असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
व्यवहार करणारे देशमुख हा मुख्यमंत्र्यांच्या मावशीचा मुलगा
“नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून निशांत देशमुख संचालकांपैकी एक आहेत. निशांत देशमुख मुख्यमंत्र्यांचा मावशीचा मुलगा आहे. त्याचा जवळपास १४०० एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला आणि युतीच्या काळात हे लोक मुखवटा घालून फिरत होते, लोकांना भडकवत होते. यांनी कुटुंबातील व्यक्ती जमिनीचा व्यवहार करत असताना यांनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
“मुख्यमंत्री आता आपले निशांत देशमुखसोबत संबंध नाही असं सांगू शकत नाहीत. त्यांचे कार्यक्रमांमधील एकत्र फोटो आहेत. जास्तीत जास्त व्यवहार परप्रांतीयांसोबत करण्यात आले असून १० टक्के स्थानिकही यामध्ये नाहीत,” असं निलेश राणे यांनी सांगितलं. यासोबत रुचा डेव्हलपर्सने ९०० एकरच्या जवळपास नाणारजवळ गुंतवणूक केली असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं.
Read Also
अमोल कोल्हे यांना मराठा समाजाचे नुकसान करायचे आहे का ? माजी आमदार योगेश टिळेकर यांचा सवालhttps://t.co/yElcgcHY8v#AmolKolhe #YogeshTilekar #MarathaReservation@kolhe_amol @iYogeshTilekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020