पुणे : काल कोंढव्याच्या पाणी प्रश्नावरून भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार योगेश टिळकर यांच्यसह भाजप नगरसेवकांनी मुजोर अधिकाऱ्याला जाब विचारविण्यासाठी जोरदार आंदोलन केले. मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर कारवाई करत योगेश टिळेकर यांच्यसह इतर भाजपच्या नगरसेवकांना देखील अटक केली. ही कारवाई राज्य सरकारच्या सूड बुद्धीने करण्यात येत असल्याचे सांगत आता टिळेकर यांच्या मुक्ततेसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी मोर्चाकडून देण्यात आला आहे.
कोंढव्यात दीड वर्षाआधी पाणीपुरवठा सुरळीत सुरु होता मात्र यंदाच्या वर्षी पाऊस चांगला होऊन देखील असं काय झालं जेणेकरून कोंढव्याला गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात होत आहे. महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता आहे तरीदेखील काही मुजोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणीकपात केली जात आहे असा घणाघात माजी आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलन करत केला होता.
योगेश टिळेकर हे भाजपचे आमदार माजी आमदार आहेत त्यासोबतच पक्षामधील ओबीसींचे आधाडीचे नेते आहेत त्यामुळेच भाजपने त्यांच्यावर राज्याच्या ओबीसी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्यांच्या अटकेनंतर आता ओबीसी मोर्च्याचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस संजय गाते यांनी थेट सरकारला आव्हान देत उद्या (७ सप्टेंबर) पर्यंत योगेश टिळेकर यांची सुटका न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना संजय यांनी थेट सध्याच्या राष्ट्रवादी सरकारला कारणीभूत धरत त्यांच्याच सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे म्हंटले आहे. तसेच टिळेकर हे अधिकाऱ्याकडे खाजगी काम घेऊन गेले नव्हते तर जनतेच्या कामासाठी गेले होते त्यामुळे आम्ही त्यांच्या अटकेचा निषेद करतो असे देखील ते यावेळी म्हणाले.शांततेच्या मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली गेल्याचे सांगत ओबीसी मोर्च्याकडून कारवाईचा जोरदार निषेद व्यक्त केला जात आहे.
काय घडले नेमकं
कात्रज-कोंढवा रस्ता बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी हे आंदोलन केले होते. महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत आठवड्यातून एक दिवस काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जातो. या जल केंद्रातून गेली २ वर्षे ही पाणी कपात करण्यात येत आहे. ही पाणी कपात बंद करून १ ऑक्टोबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने टिळेकर आणि त्याभागातील नगरसेवकांनी स्वारगेट येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांना जाब विचारला. तेव्हा जाधव आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. तसेच ऑफिसची तोडफोड करण्यात आली. याबाबत महापालिकेने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
Read Also
राज्य सरकारच्या दुर्लक्षापणामुळेच मराठा आरक्षण रेंगाळले – हर्षवर्धन पाटीलhttps://t.co/2RotEWU6Ss@Harshvardhanji
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020