मुंबई : कंगनाने मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यांवर टिपण्णी करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे, असा आरोप केला आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
सरनाईक म्हणाले, मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही. भाजपाने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे #आमचीमुंबई
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 5, 2020
सरनाईक यांनी कंगना बाबत बोलताना जर ती मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत.असे ट्विट केले होते त्यानंतर महिला आयोगाने त्याच्याविरोधात ट्विट करत त्यांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली होती.
According to @ANI @ShivSena MLA Pratap Sarnaik threaten @KanganaTeam in an interview. He must immediately get arrested @CPMumbaiPolice. Taking suo motu. pic.twitter.com/S0lUN2zobX
— Rekha Sharma (@sharmarekha) September 4, 2020