नवीदिल्ली : शेतकरी बिलावरून अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या राजीनाम्याबाबत भाष्य करताना भाजपने एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात का घेतले नाही असा निशाणा साधला आहे.
एनडीएचा घटक असलेल्या अकाली दलातील नेत्याने भाजपने मांडलेल्या शेतकरी बिलाला विरोध करत थेट राजीनामा दिल्याने केंदीय राजकारणात पुन्हा एकदा भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणणुकीच्या काळात आपण शेतकऱ्यांना आश्वासन देता मात्र सत्तेवर आल्यावर ते विसरता काल अकाली दलाच्या एका नेत्याने राजीनामा दिल्याने संपूर्ण देशाला जाग आली आहे अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपचे म्हणणे आहे की हे बील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे मात्र अकाली दलातील नेत्यांना काही संशय आल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी म्हंटले. शेतकऱ्यांसाठी आणलेल्या बिलावर भाजपने एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा करायला हवी,हवं तर शिवसेनेला त्यामध्ये बोलावू नका मात्र त्याबाबत चर्चा तर करा असे मत संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.
पंजाब हे देशातील महत्वाचे राज्य आहे जर बंजाबमधून शेतकऱ्यांच्या विरोधातील अन्यायाला वाचा फुटत असेल तर मला असे वाटते त्यांचे मत सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे अकाली दल आणि शिवसेना हे दोनीही पक्ष भाजपसोबत सुरुवातीपासून होते म्हणूनच पंजाबसोबत महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहणार आहे असे देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हंटले.
Read Also
…म्हणून राज्यपालांनी कंगनाला भेट दिल्याचा खेद वाटतो : सचिन सावंतhttps://t.co/frJhxzGCS5#SachinSawant #KanganaRanaut #Bhagatsinghkoshyari #Maharashtracongress
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020