मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भजापच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाबाबत भाष्य केलं होतं.
राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणा प्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे असंही भाजपने म्हटलं आहे. हे चक्का जाम आंदोलन भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
वसई विरार जिल्ह्यात ओबीसी समाज मोठया प्रमाणात वसलेला आहे म्हणून आमदार प्रसाद लाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आमदार, वसई विरार जिल्हा प्रभारी ह्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन सकाळी १० वाजता पंचवटी हॉटेल, अंबाडी रोड, वसई येथून सुरुवात करण्यात आली आहे.
या सरकारला आम्ही झोपू देणार नाही
ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही असंही देवेंद्र फडवीस म्हणाले.