दिल्ली : भाजपाच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागावी लागली. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी भीमताल दौऱ्यात असताना विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांच्यावर निशाणा साधला होता. टीका करत असताना भगत यांनी ह्रदयेश यांच्या वयावरून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे काँग्रेसनं संताप व्यक्त करत भाजपाला धारेवर धरलं. इंदिरा ह्रदयेश यांनीही ट्विट करून भगत यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज्यातील महिला योग्य वेळी याचं उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.
आदरणीय @IndiraHridayesh बहिन जी आज मैं अति दुखी हूँ । महिला हमारे लिए अति सम्मानित व पूज्या हैं। मैं व्यक्तिगत रूप से आपसे व उन सभी से क्षमा चाहता हँ जो मेरी तरह दुखी हैं। मैं कल आपसे व्यक्तिगत बात करूँगा व पुनः क्षमा याचना करूँगा। 🙏🏻🙏🏻
— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) January 5, 2021
भगत यांच्या विधानावरून राज्यात वातावरण तापत असल्याचं लक्षात येताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मध्यरात्री १२:३० वाजता ट्विट करून माफी प्रदेशाध्यक्ष भगत यांनी केलेल्या विधानाबद्दल मागितली. “आदरणीय इंदिरा ह्रदयेश बहिणजी, आज मी खूप दुःखी आहे.
आमच्यासाठी महिला सन्मानीय आणि पूज्यनीय आहेत. मी तुमची आणि माझ्याप्रमाणेच दुःखी असलेल्यांची माफी मागतो. मी उद्या तुमच्याशी बोलेन. पुनःश्च क्षमा मागतो,” असं ट्विट करत मुख्यमंत्री रावत यांनी वादावर पडदा टाकला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष भगत नेमकं काय म्हणाले?
भाजपाचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्या इंदिरा ह्रदयेश यांनी केला होता. ह्रदयेश यांच्या या दाव्यावर उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. भाजपाचा कोणताही आमदार वा मंत्री काँग्रेसच्या संपर्कात नाही. असं तर नाही ना की विरोधी पक्षनेत्या आपल्या मुलासह भाजपात प्रवेश करतील. पण, मी असेपर्यंत त्यांना भाजपात येता येणार नाही,” अशी टीका भगत यांनी केली.
याचवेळी भगत यांनी “इंदिरा ह्रदयेश वृद्ध झाल्या आहेत, आता त्यांच्या संपर्कात कोण येणार आहे? बुडत्या जहाजाच्या कोण संपर्कात येतं?,” असं विधान केलं. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेत संताप व्यक्त केला होता.
Read Also :
‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी