कोल्हापूर : राज्यात आगामी काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आहेत. या दृष्टीने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देखील भाजप या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचा नारा दिला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार, अशी घोषणाच चंद्रकांत पाटलांनी इचलकरंजीत बोलताना केली. श्रीक्षेत्र नरसोबावाडी दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.
मागील वर्षी आर्थिक गाडी रुळावरून घसरली ती नवीन वर्षांत रुळावर येईल, अशा नववर्षाच्या शुभेच्या चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आहेत. तर मागील निवडणुकीत भाजपला सत्तेपासून लांब राहावे लागले होते. त्यामुळे यंदा निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.