मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी बिहार विधानसभा निवडणूक आणि हैद्राबाद महापालिकेतील यशाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. आता भाजपने मुंबई महापालिकेवर देखील भगवा फडकवण्याची घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में भाजपा को बिहार में जीत और फिर हैदराबाद में जिस तरह की सफलता मिली यह बताता है कि देश को मोदी जी के नेतृत्व पर कितना भरोसा है, लोगो ने विकास की बात मान ली है। हमे पूरा विश्वास है कि BMC पर भी भाजपा का भगवा लहराएगा।
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 5, 2020
भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने बिहारमधील विजयानंतर हैद्राबादमध्ये ज्याप्रकारे विजय मिळवला आहे यावरून सिद्ध होत कि देशाचा मोदींच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे. लोकांनी विकासाची साथ धरली आहे. बीएमसीवर भाजपचाच भगवा फडकेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
शिवसेना का 30 साल के भ्रस्टाचार से लोग पीड़ित है। कोरोना संकट में जो लापरवाही की यह लोगो को याद है। हमे विश्वास है कि BMC पर भाजपा का झंडा लहराएगा।
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 5, 2020
शिवसेनेच्या 30 वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्याही लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई मबापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार आहे, असा दावा राम कदम यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा विषय सध्या चर्चेत आहे.