मुंबई : माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं म्हणत अभिनेत्री कंगनाने ट्विटरच्या माध्यातातून शिवसेनेवर टीका केली आहे.विशेष म्हणजे यावेळी तिने दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.
भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ वर पोहचली असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. आता यावरून कंगनाने थेट मुख्यमंत्री ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित”. कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का 🙏 https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
Read Also
मुंबई तुंबल्यावर ओरडणारे अहमदाबाद तुंबल्यावर गप्प का? शिवसेनेचा भाजपला सवालhttps://t.co/XLS5s89EmD#BJP #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020