नागपूर – विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महविकासघडिने बाजी मारत अनेक ठिकाणी भाजपला हार मानवी लागली त्यामुळे महाविकासाआघाडीमधील नेत्यांकडून भाजपचा पाणउतारा करण्यात आला. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले शिवसेनेचा एकही उमेदवार आले नाही हा मुद्दा धरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनवर निशाणा साधला आहे.
“नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले, हे जरी खरे असले तरी यामध्ये शिवसेनेला काहीच मिळाले नाहीये. तरीही त्यांचे नेते बरळत सुटले आहेत. हे म्हणजे, दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला आणि शिवसेनावाले मिठाई वाटत फिरताहेत”, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी जरूर एकत्रित लढावं. याचे त्यांना तात्कालिक लाभ होतील, पण नंतर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. दीर्घकालीन लाभ आम्हालाच मिळणार आहेत. कारण त्यामध्ये मोठी स्पेस आम्हाला मिळणार आहे. तीन पक्षांच्या लोकांना एकत्रितपणे लढता यावे, येवढी जागाच नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लढण्यासाठी जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील, तेव्हा त्यांना जागाच राहणार नाही. तुलनेत आम्हाला भरपूर वाव असेल. त्यासाठी आम्हाला तयारी मोठी ठेवावी लागेल. पण त्याची काळजी नाही. आमची तयारी सुरू आहे.”