मुंबई : राज्यातल्या महामारीच्या परिस्थितीला घेऊन आणि नुकत्याच न्यायालायने सुनावलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तातडीने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
एकीकडे राज्य सरकार केंद्राने हवी तशी मदत पुरवली नाही असा आरोप करत आहे, तर दुसरीकडे केंद्राकडून मात्र राज्यालाच सर्वात जास्त मदत करण्यात आल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे. एकीकडे आपण देशात लसीकरण करण्यात अग्रणी आहोत असे सांगितले जाते, तर दुसरीकडे परत केंद्राकडून लसींचा योग्य पुरवठा केला जात नसल्याची तक्रार केली जात आहे. या उलटसुलट दाव्यांमुळे, या विषयावरील सत्यस्थिती जनतेसमोर येण्याची गरज आहे.
तसेच, फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात टिकवलेला मराठा आरक्षणाचा कायदा, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यात अपयशी ठरले, या देखील गोष्टीचा उलघडा जनतेला झाला पाहिजे. त्यामुळे, राज्य सरकारने तातडीने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी दरेकरांनी मागणी केली आहे.
Read Also :
- पुण्यात उभारलं जाणार देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर; महापालिकेचा निर्णय
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून केली महत्वाची मागणी, म्हणाले…
- राज्यातल्या लॉकडाऊनमध्ये होणार वाढ? राजेश टोपेंचे सूतोवाच