मुंबई : बोरिवलीतील बाभई आणि वझिरा या गावठाणमध्ये प्रचार सुरू असताना भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मच्छिचा वास सहन न झाल्याने या प्रचार यात्रेच्या दरम्यान नाकाला रूमाल लावूनच प्रचार केला. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना पियुष गोयल यांचे वागणे अपमानास्पद वाटले. अशा पद्धतीचे वर्तन जर गोयल करत असतील तर त्यांना आम्ही धडा शिकवू, आमच्या समस्यांबद्दल जाणून घेण्याऐवजी आमच्या मासळीच्या वासाचा तिटकारा करत असतील तर त्यांना कशासाठी मदत करायची अशा सवाल मच्छिमारांनी केलाय. यावरून आता कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टिकास्र सोडलं आहे.
हेही वाचा..पुण्यात मोहोळांची की धंगेकरांची ताकद ? ; आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुणेकरांचं मतं काय?
नाकाला रुमाल लावून फिरणारे पीयुष गोयल हे गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी होऊच शकत नाहीत. कदाचित आता गावठाणेही खारजमिनीवर पाठवण्याचे मनात असेल. गावठाणात राहणारे कोळी बांधव हे मुंबईतील प्रथम नागरीक आहेत. कोळी बांधव हे आमच्या संस्कृतीचा व मासे ही मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत. झोपडपट्टीवासियांसहित माझ्या कोळी बांधवांचा तिरस्कार करणाऱ्या या व्यक्तीला उत्तर मुंबईतील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिलाय.
हेही वाचा…नरेंद्र मोदी की राहुल गांधी, आगामी पंतप्रधानांबाबत पुणेकर नेमकं काय म्हणतात?
तर हा तर कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अवमान आहे. या महाशयांना कोळी समाजाची मतं हवीत, पण त्यांना कोळी संस्कृतीचा तिरस्कार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी झोपडपट्टीवासियांना आपल्या हक्काच्या जागेवरून बेदखल करून खारजमिनींवर स्थलांतरित करण्याचे लोकविरोधी विधान केले होते. आता कोळी समाजाचा असा अपमान. सूट-बूट आणि झूठ-लूट वाले हे भाजपा नेते इथल्या गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी होऊच शकत नाहीत असा टोला माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी लगावला आहे.
दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मतदारसंघातील गावठाणांमधून जाताना मासळीचा वास सहन न झाल्याने गोयल यांनी नाकाला लावलेला रूमानच त्यांना अडसर ठरत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये संमिश्र लोकवस्ती आहे. या मतदारसंघात उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय यांच्या सोसायटी आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्टी आणि मच्छिमारांची गावठाणेही आहेत.
मुंबईचा कोळी ओळख पहिली,
पहिला नागरिक व्यवसाय मासळी..
साधा माणूस साधी राहणी,
माझा कोळी बांधव लय मानी..निवडणुकीचा उमेदवार तो पाहुणा,
पाहुण्यांना मासळीचा वास सहन होईना..
नाक दाबण्याची पाळी पाहुण्यांवर आली,
प्रचारात नुसती घाई-घाई, पळापळ झाली..अहो पाहुणं ही मुंबई हाय कोळ्यांची,… pic.twitter.com/boQTm9FDR0
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ