नागपूर : राज्यात सध्या रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जुंपली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याने भाजप नेते महाविकास आघाडीवर सडकून टिका करत आहेत. मात्र अर्णब गोस्वामी यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलचे भडकले व त्यांनी पत्रकाराला अरे – तुरेच्या भाषेत बोलू लागले.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना अर्णब गोस्वामी आणि हिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाने जमीन दिला आहे, तरी भाजप का आंदोलन करतोय ? असा एक प्रश्न पत्रकाराने विचारला असता चंद्रकांत पाटील चांगलेच चिडले व त्यांनी अरे – तुरे च्या भाषेत उत्तर देण्यास सुरूवात केली.
चंद्रकांत पाटील यांनी अरे-तुरेची भाषा सुरू केल्यानंतर पत्रकार देखील चिडले व त्यांनी माफी मागितली तरच पुढे पत्रकार परिषद असा पावित्रा घेतला. अखेर चंद्रकांत पाटील यांनी आपण वयाने मोठे आहोत म्हणून आरे – कारे च्या भाषेत बोललो, अशा सारवा सारव करत माफी मागितली व परिषदेतून काढता पाया घेतला.