पुणे – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागला असून या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 7 हजार 500 मतांनी बाजी मारली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हार मानवी लागली.
या विजयाविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील भाष्य केले.
समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केले. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी शेलकी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार असे सांगितले. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.