हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव पाटील यांनी हडपसर मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा…“आदित्य अन् उद्धव ठाकरेंना तुरूंगात पाठवण्यासाठी राऊत तयारी करताहेत”
माधुरी अक्षय आढळराव यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अभिजीत बाबर, राष्ट्रवादीच्या नम्रता गोंदळ, रिपाइंच्या सरिता कुंभार, सरिता सोनवणे, छाया बोरूडे, राणी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी अक्षय आढळराव पाटील यांनी ससाणे नगर येथील रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. तसेच ससाणे नगर येथील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या वतीने त्यांचा स्वामींची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.
हेही वाचा…“साहेबांनी आता आराम करावा, असं नेत्यांनी सांगायला हवं,” अजितदादांची प्रतिक्रिया
यावेळी माधुरी आढळराव पाटील म्हणाल्या की, आज आम्ही घरोघरी जावून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करीत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हडपसर भागात महिलांचे प्रश्न, लाईट, पाणी, रास्ते, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या अनेक प्रश्नांवर पुढील काळात काम करण्याची गरज आहे.
अभिजीत बाबर म्हणाले, विकासासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचां खासदार निवडून देणे गरजेचे आहे. मागच्या वेळी चूक झाली. संभाजी महारांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला जनतेने निवडून दिलं. या खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही कार्यकर्त्यांने कोणाचाही फोन उचलला नाही. जो काही निधी आणला तो शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आणला. शिरूर लोकसभा मतदार संघात तब्बल 700 गांव आहेत. अन् अस एकही गांव नाही जिथे आढळराव यांचा निधी पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदा शिवाजीराव आढळराव पाटील हेच विजयी होणार, असा आशावाद बाबर यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा