मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतवरून राज्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असून कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हि महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हणत सरकारवर हल्ला चढवला आहे.
” सत्ताधारी पक्षाने एका स्त्रीला अशी धमकी देणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही . महाराष्ट्र आणि मुंबईची काळजी खरंच सत्ताधारी पक्षाला असेलतर त्यांनी आपल्या प्रशाकीय कामात दाखवावी महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांमुळे जनता त्रास आहे मुंबई त्रस्त आहे त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रात करावे”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
“गेल्या काही दिवसापासून कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढला आहे या वादाला इतके महत्व देण्यासारखे काहीच नव्हते परंतु महाराष्ट्राच्या जनतेने दुर्लक्ष करावे यासाठी शिवसेनेने हि गोष्ट लावून धरली आणि तिच्या मागे लांडग्या सारखे लागले असा आरोप पाटलांनी यावेळी केला आहे
“हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे परंतु महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून मानाने साडी चोळी देऊन पाठविले होते परस्त्री विषयी आदरयुक्त धोरणाचा महाराजांनी नेहमीच आदर केला आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती “असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.