मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज ही सुनावणी झाली. दरम्यान सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. यानंतर पुन्हा सुनावणी झाली. यावळी कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपले म्हणणे मांडावे असे कोर्टाने नमूद केले आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी झाली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यानंतर मराठा बांधवांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. ही नाराजी तसेच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले होते.