मुंबई : कंगना राणावत, नौदल अधिकाऱ्याला मारहाण आणि मराठा आरक्षण प्रकरणानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. काही विषयांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य करणे टाळले, मात्र सूचक इशारा देखील दिला. आता यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणाले की,’जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुळात हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
नाचता येईना अंगण वाकडे pic.twitter.com/RBBmiYUYvE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 13, 2020
चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे किती रुग्णालये आणि कोविड सेंटरचं तुम्ही निरीक्षण केलं? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आपली जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली यांचे उत्तर राज्याच्या जनतेला द्यावं. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे
"मुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज…" pic.twitter.com/iRrPOuwflS
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 13, 2020
‘विरोधी पक्ष राजकारण करतोय असा मुख्यमंत्र्यांचा दावा असेल तर कंगनाचा विषय महाराष्ट्रात कुणी सुरू केला? शिवसेनेने ना?,’ असा प्रश्न पाटील यांनी केला. सुशांतसिंहच्या प्रकरणात एफआयआर दाखल करून मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळं तुम्ही ज्याला ‘मास्क’ म्हणता तो मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे,’ असा टोला पाटील यांनी लगावला आहे.