पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने बावनकुळे यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही. आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का? असा सवाल त्यांनी केला. आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं, असंही बावनकुळे म्हणाले.
📍 पुणे येथे मध्यमंशी संवाद https://t.co/QppVgRU7z0
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 14, 2022
पवार कुटुंबियांनी बारमतीमध्ये 60 वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता गेलेले शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेसोबत गेले. शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
सोबतच, गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले. सेना घराघरापर्यंत पोहचवली. मग त्यांना ठाकरे गट का सोडावा लागला? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील, असं बावनकुळे म्हणाले.