नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. तीन पक्षाचं सरकार असल्यावर कोणीतरी नाराज होणारच. ते स्वाभाविक आहे. मात्र सरकारला त्याचा काहीच धोका नाही. सरकार मजबूत आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या ११ आमदारांसोबत चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कोरोना परिस्थितीचा भुजबळांकडून आढावा,म्हणाले . .
नाशिक जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी स्थिती नियंत्रणात आहे.
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी आहे.
प्रत्येक गल्लीबोळात जाऊन करोनाची टेस्ट करण्यात आली. त्यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे,
रुग्ण वाढत असले तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला आहे.
तसेच यावेळी गुजरातला जाणारे पाणी अडवण्याची गरज असल्याचंही भुजबळांनी यावेळी सांगितलं. गुजरातला वाहून जाणारं पाणी नाशिकला वळवणं आवश्यक आहे. आताच हे पाणी अडवलं नाही तर पुढे कधीही हे पाणी अडवणं शक्य होणार नसल्याचं देखील भुजबळ यावेळी म्हणाले.
Also Read This
संविधान अवमान प्रकरणी प्रवीण तरडेंवर गुन्हा दाखल करा ! अमोल मिटकरींचे गृहमंत्र्यांना पत्रhttps://t.co/ek1B4Xszol@amolmitkari22 @NCPspeaks @AnilDeshmukhNCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 24, 2020