मुंबई : राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे. तसेच या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतला आहे.मात्र त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पुन्हा एकदा लक्ष करायला सुरुवात केली आहे.मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला ज्या प्रकारे उत्तर पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यपाल यांच्याकडे जी निवेदने येत असतात. ती निवेदने घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जळगावमधील जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
मंदिरांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी कोणतीही घटना घडली नाही. मंदिराजवळील फुल विक्रेता, नारळ विक्रेता, चहा टपरी चालवणारे बेरोजगार झाले आहे. त्यांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही, असे सांगत जर मदिरालय सुरू होत असेल तर मंदिरं का सुरू होत नाही, अशी आमची मागणी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.याचबरोबर, हे तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. पण, त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो. याबद्दल आश्चर्य वाटते. तसेच, देशभरात मंदिर उघडण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून मंदिरे उघडता येतात असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
Read Also
बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहेhttps://t.co/nTFoXqWvjW#KanganaRanaut #Shivsena #CMThackarey @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020