मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौऱ्यात काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या मदतीवर शेतकरी मात्र संतप्त झाले.
परतीच्य पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले. शेतकऱ्यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वकाही हिरावून घेतलंय, पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. याच कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात १६ जणांचा बळी गेला.
सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा चेक दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय? अशा शब्दात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोहचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली.
Read also :
“जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..”; फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा https://t.co/VBQhgZzlqw @Dev_Fadnavis @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @OfficeofUT @Devendra_Office
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020