महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा आज करण्यात आली आहे. जवळपास १० हजार कोटी रुपयांची मदत आता महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांना करणार आहे.
यामध्ये फळबाग आणि इतर पिकांचे निकष ठरवून दिलेले आहेत. शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार तर फळबागेसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्रकार परिषद घेत ही रक्कम जाहीर केली.
या पत्रकार परिषदेत माध्यमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा जाहीरनाम्यातील कोरोना लास मोफत वाटण्याच्या आश्वासनाबाबद्दल तसेच विरोधी पक्षाने केंद्राकडून मिळणाऱ्या रकमेबद्दल काय भूमिका घ्यावी असे विचारण्यात आले. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलण्यास नकार देत. जे काही राजकीय आहे ते मी येणाऱ्या दसरा मेळाव्यात बोलले असे उत्तर दिले
दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या मदतीनंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे, विरोधी पक्ष भाजपने सरकारने केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी आहे अशी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे, किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सर्व राजिक्य प्रश्नाची उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे . त्यामुळॆ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात विरोधकांवर कोणती तोफ डागणार याची उत्सुकता आता सर्वाना लागली आहे.