पुणे: जागतिक महामारीचे सावट महाराष्ट्र राज्यावर गडद होत चालल्याचे दिसून येताना जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता कडक लॉकडाऊन केला असून जिल्ह्या बाहेर जायचे असेल तरी ई पास असणे गरजेचे बनले आहे. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई पास गरजेचा केल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
सरकारच्या सातत्याने बदलणाऱ्या नियमांमुळे लोकांचा गोंधळ उडत आहे. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारचा नुसता गोंधळ सुरु असल्याचे म्हटले आहे. चित्रा वाघ त्यांच्या ट्विट मध्ये लिहितात की,”काल परवापर्यंत नवीन नियमावलीत E PASS नसणार असे सांगण्यात आले होते. आता या नवीन माहितीने लोकांचा गोंधळ उडणार आहे. एखादी नवीन हेल्पलाईन तयार करा. ज्यामुळे लोकांची मदत होईल.
हे काय आता नविन….काल परवा पर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं आता अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार
एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा ज्याने लोकांना मदत होईल
राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत ज्याने नुसता गोंधळ झालाय https://t.co/qVpFXjnuD5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 23, 2021
राज्यात १७६० लोक वेगळं सांगतायत आणि ज्याने त्याने नुसता गोंधळ केलाय” अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी सरकार बाबत संताप व्यक्त केला आहे.आपल्याला जर पोलिसांचा ई पास हवा असेल तर ऑनलाईन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावून पण आपण मिळवू शकता. आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा पास काढू शकता.