मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. त्यांनी काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि त्यांना धीर दिला.
शेतीचं नुकसान झाल्यानं रडू नका. खचून जाऊ नका. आलोय ना मी आता घाबरू नका. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी धीर दिला.
मी या ठिकाणी पहिल्यांदा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. आता तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. मी केवळ आकडे सांगायला आलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. धीर सोडू नका. खचून जाऊ नका. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 90 टक्के पंचनामे झालेले असतील. तेव्हा तुमचं समाधान होईल, अशी मदत तुम्हाला केली जाईल, असं सांगतानाच मी जे बोलतो ते करतो. जे बोलत नाही. ते करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री आपल्या गावात आलेले पाहून पुरुषच नव्हे तर महिलांनीही हंबरडा फोडत आपल्या व्यथा मांडल्या. आमच्या आयुष्यात आम्ही असा पाऊस पाहिला नाही. 8 ते 10 फूट पाणी होतं. त्यामुळे आमचं संपूर्ण शेत वाहून गेलं. ऊस, कांदा, कपाशी आणि द्राक्षंही नासली. साडेसात एकरावरील द्राक्षांपैकी साडेचार एकरावरील द्राक्षं वाहून गेली, असं सांगत शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला.
Read also:
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडे म्हणाल्या…
https://t.co/CrIZtd43AU#Eknathkhadase #PankajaMundhe #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020