मुंबई : 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी होणार आहे.
आज दुपारी इंदू मिल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम असणार आहे.
हे स्मारक लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली होती. स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू, असे ते म्हणाले होते. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा, असे मत व्यक्त केले होते.