प्रवरानगर लोणी : बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपले जीवन वाहिले होते. लोकांच्या अडचणी दूर करण्याचे काम विखे यांनी केले. मी राजकारणापासून अलिप्त राहिलो. समाजासाठी सत्ता आणि राजकारण पाळलं. राजकारण करत असताना त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी भर दिला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले.
यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे कौतुकही केले. प्रवरानगरमध्ये पद्मश्री बाळासाहेख विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रवरानगर, छत्रपती शिवाजी महाराज तसंच वीर विरांगणा कर्मयोग्यांच्या भूमीला मी वंदन करतो’ असं मराठीतून म्हणत भाषणाला सुरुवात करत उपस्थिती मान्यवरांची मन जिंकली.
‘पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याच्या वापराची मोठी समस्या आहे. पाणीटंचाईची मोठी समस्या महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मोठे काम झाले आहे’असं म्हणत फडणवीस यांचं कौतुक केले आहे. ‘राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. या भागात अटल भूजल योजनेद्वारे काम सुरू आहे. जल जीवन मिशन योजनेतून महाराष्ट्रातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात सुद्धा लाखो लोकांना पाणी पुरवठा केला आहे’ अशी माहितीही त्यांनी दिली. ‘कोरोनाचा धोका अजून ठळलेला नाही. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत अजून जास्त आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा, नेहमी हात स्वच्छ करत राहा. ही लढाई आपण नक्की जिंकू आणि जिंकणारच, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीची ताकद कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
या नव्या पिढीनंतर पुढची पिढी आणखी कमजोर झालेली आढळून आली आहे. पण, विखे कुटुंब यासाठी अपवाद ठरले आहे, असंही मोदी म्हणाले. ‘बाळासाहेब विखे पाटलांचा प्रत्येक राजकीय पक्षांशी संबंध होता. त्यामुळेच बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्यावर असलेले पुस्तक हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांना विखे यांनी जवळून पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांना जवळ आणले आणि सहकार क्षेत्राशी जोडले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची आणि कुठल्या ही धर्माची नाही.
आतापर्यंत सर्व जाती आणि धर्मांना स्थान दिले आहे’ असंही मोदी म्हणाले. फक्त महाराष्ट्राचं नाहीतर अटल बिहारी वाजेपयी यांच्या मंत्रिमंडळात काम करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रासाठी काम केले होते. त्यांच्या आत्मचारित्राचे देह वेचावे हे नाव समर्पक आहे. ग्रामीण भागात जेव्हा शिक्षणाची चर्चा नव्हती. तेव्हा विखे पाटील यांनी जनजागृतीचे काम केले. आजपासून बाळासाहेब विखे यांचं नाव जोडणे महत्त्वाचे आहे. शेती करण्यासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञान असल्याशिवाय कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीला शेती करता येणार नाही.
बाळासाहेब विखे यांना शेतीबद्दल चांगली जाणीव होती. त्यामुळे त्यांनी हा अर्थपूर्ण बोध काढला आहे, असंही मोदी म्हणाले. ‘शेतकरी काय पिकं घेईल, कोणती बियाणं वापरणार, आर्थिक अडचणी काय असणार, पिक विमा, यासाठी केंद्र सरकारने अडचणी दूर करण्यासाठी मदत केली आहे. PM किसान समान योजनेतून शेतकऱ्यांच्या अडचणीतून मुक्तात करण्यात आली आहे. या योजनेतून 1 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यामध्ये कुणीही मध्यस्थी नाही. एवढंच नाहीतर मेगा फ्रुड पार्क, कोल्ड स्टोरेज, अनेक योजनांवर मोदी सरकारचे काम सुरू आहे’ अशी माहिती ही मोदींनी दिली.
Read Also :
शिवसेनेचे मोठे नेते हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्दhttps://t.co/MIXVyuvLcq @CMOMaharashtra @uddhavthackeray
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020