मुंबई : देशातील तसेच राज्यातील महामारीच्या चिंताजनक परिस्थितीला घेऊन काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या महामारीचा मुकाबला करण्यासाठी काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. तसेच प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनीदेखील भाष्य केले होते.
परंतु केंद्रातल्या मंत्र्यांनी आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी या सूचनांची खिल्ली उडवत, या नेत्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज महाराष्ट्र काँग्रेसकडून, तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ट्विट करत भाजपवर हल्लबोल करण्यात आला आहे.
सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 23, 2021
‘सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष महामारीत लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत.’ अशी बोचरी टीका काँग्रेसकडून भाजपवर करण्यात आली आहे.
त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे याचे उत्तर द्यावे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 23, 2021
तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे याचे उत्तर द्यावे अशी घणाघाती टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, चंद्रकात पाटील यांचावर केली आहे.