मुंबई : पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यात उत्स्फूर्त वातावरण दिसतंय. महाविकास आघाडीचेच उमेदवार प्रश्न सोडवतील हा मतदारांना विश्वास आहे. दरवेळी 37 टक्क्यांपर्यंत होणारं मतदान यावेळी 70 ते 80 टक्के होईल. चंद्रकांतदादाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी खाली पाहिले नाही’, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.
दवीधर आणि शिक्षक निवडणुकीत मतदारांची भूमिका स्पष्ट आहे. भाजप आता नाही हे मतदारांचे ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे होणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले.
‘कितीही रेड कार्पेट टाकलं तरी सिनेसृष्टी मनाने मुंबई सोडून जाणार नाही, केंद्र सरकारने दबाव टाकू नये. मुंबईला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे. सुशांत सिंग प्रकरणानंतर आता बॉलिवूडला लक्ष केलं जातंय. मुंबईचा आत्मा काढून घेण्याचा हा प्रकार आहे. याला महाराष्ट्र भाजपची मान्यता आहे का?
मागच्या पाच वर्षात काय दिवे लावले याचं उत्तर द्या’ असा घणाघात यावेळी सतेज पाटलांनी केला.
सुविधा नसत्या तर 50 ते 60 वर्ष बॉलिवूड इथं राहिलं असतं का? मुंबईचं अस्तित्व हिरावून घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा सतेज पाटील यांनी यावेळी दिला..