मुंबई : लोकसभा निवडणुक संपल्यानंतर राज्यात आता विधानसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. यातच विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा निवडा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. तर महाविकास आघाडीकडे सामुदायिक नेतृत्व हेच आमचं सुत्र अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी आज दिली आहे. यावरून आता भाजपने महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री पदाशिवाय विधानसभेच्या निवडणुकीला जाण्यास धोका आहे. असं राऊतांनी म्हटलं होतं. तर आमच्याकडे सामुदायिक नेतृत्व आहे. असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरून आता भाजपने यावरून महाविकास आघाडीवर खोचक टिप्पणी केली आहे. विश्वप्रवक्ते म्हणतात ‘नवरदेव दाखवा तरच लग्न.. चेहऱ्याशिवाय पुढे जाण्यास धोका, ठाकरेकडे पाहून लोकसभेत मतदान झालं.
दुसऱ्या बाजूला सामुदायिक नेतृत्व हेच आमचं सूत्र. शरद पवार साहेब. असं म्हणत महाविनाश आघाडीचा नवरदेव कोण ? उबाठा आणि शरद पवार गटात जुंपली. अन् कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत लग्न तुमचं जेवणार मात्र आम्ही अशी खोचक टिप्पणी भाजपने केली आहे. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्याकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल
हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका
हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका
हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका
हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये