काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे नवीन ट्विट पुन्हा एकदा वाद निर्माण करू शकते. ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा चालू असतो, त्यावेळी विरोध नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन नेहमी व्यवस्थापित करण्यात येते, असे कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले आहे. सिब्बल यांच्या वारंवार ट्विट करण्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरु झाल्याची चर्चा आहे.
कपिल सिब्बल यांनी पुन्हा ट्विट केले आहे. “ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा दिला जात आहे, तर आयुष्यात, राजकारणात, न्यायामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, सोशल मीडिया मंचांवर ऐच्छिक असतात. मात्र, समर्थन बरेचदा व्यवस्थापित केले केले जाते,” असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
When fighting for principles
In life
In politics
In law
Amongst social activists
On social media platformsOpposition is often voluntary
Support is often managed
— Kapil Sibal (@KapilSibal) August 26, 2020
मंगळवारी सुद्धा कपिल सिब्बल यांनी ट्विट केले होते. त्यावेळी ‘माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा’ असे ट्विट केले होते. त्यामुळे कपिल सिब्बल काँग्रेसशी बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत सर्वसमावेशक बदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती.
पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
Also Read This
जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार ?https://t.co/hISNJKcXJs@BJP4Maharashtra @bjp4mumbai @BJPLive @BJP4PuneCity
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020