मुंबई : यावर्षी उन्हाळा सरत आला तरीही पाण्याची कमतरता राज्याच्या अनके भागात त्या मानाने कमी जाणवत आहे. तसेच, राज्यातल्या महामारीच्या परिस्थितीमुळे, पाणी प्रश्नाचं राजकारणी किती भांडवल करतात, याची देखील उपरती होत आहे, असे असतानाच आता काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे उजनी धरणाच्या पाण्यावरून आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत.
राज्य सरकारने उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच, जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात आज प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर तसेच, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उजनीतील सोलापूरकरांच्या हक्काचे ५ टीएमसी पाण्याचा एक थेंब देखील पाणी इंदापुराला जाऊ दिले जाणार नाही. ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’, अशी भूमिका आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यातून देखील याला प्रचंड विरोध सुरु झाला असून, सर्वपक्षीय नेत्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे, पाण्याच्या या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला, तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले होते. मात्र, दुसरीकडे हा निर्णय घेतला गेल्यामुळे, त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे आता राज्यात हा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Read Also :
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- राज्यातल्या लॉकडाऊनमध्ये होणार वाढ? राजेश टोपेंचे सूतोवाच
- संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून केली महत्वाची मागणी, म्हणाले…
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता शासकीय सेवेतील पदोन्नती होणार अशाप्रकारे…
- या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे, त्यांना फक्त बारचालकांचं वीजबिल दिसतं