मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबद्दल राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता महसूल मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी , हे महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट असल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 4, 2020
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाक व्याप्त काश्मीर म्हटल्याने अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. तसेच मुंबईत पुन्हा न येण्याचा सल्लाहि तिला देण्यात आला आहे. यापार्शवभूमीवर बाळासाहेब थोरात यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. ” , अशा शब्दात थोरातांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत.” , अशी टीका थोरातांनी केली आहे.
ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 4, 2020
तसेच त्यांनी कंगनालाही सुनावले आहे,” ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान आहे.”