वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/adhirrcinc/status/1297463692553052164?s=20
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 लाख पार झाली आहे. तर, दिवसाला 70 हजार नवीन रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट अद्याप गडद असून ते टळलेले नाही. या परिस्थिती विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे धोकादायक आहे. त्यामुळे, पुढील महिन्यात होणाऱ्या या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे चौधरी यांनी म्हटले आहे.