दिल्ली : काल पाकिस्तानच्या विरोधी पक्ष्याच्या एका नेत्याने पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक बद्दल काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर पडत आहेत. जेव्हा मोदी सरकारने पुलवामाच्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती तेव्हा त्यावर अनेक राजकीय मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.
पण आता पाकिस्तानच्या या नेत्याने केलेल्या खुलास्याबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मागे त्यांचा हात असल्याचं पाकिस्तानने स्वीकारलं आहे. आता काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशाची माफी मागायला हवी, असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपच्या विविध नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने पुलवामा हल्ल्यात षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तान ने माना कि पुलवामा में हमला उन्होंने किया। अब कांग्रेस वाले और बाक़ी लोग जो साजिश की बात करते थे उनको देश से माफ़ी मांगनी चाहिए।
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) October 30, 2020
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पाकिस्तानच्या नेत्याचे विडिओ शेयर करत मोदींच्या 56 इंची छातीवर तहहयात भावी पंतप्रधान, सर्वच विषयातील तज्ञ, कलियुगातील हरिश्चंद्र म्हणजेच देशातील एकमेव जाणते शरदचंद्र पवारसाहेब यांनी विचारलेल्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर! अशी जहरी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या त्या विरोधी पक्षाच्या नेत्याने पाकिस्तानी संसदेत बोलताना पुलवामा हल्ला हा पाकिस्तान सरकार पुरस्कृत हल्ला होता, असा आरोपी त्यांनी केलाय, त्याचबरोबर भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटकसुद्धा सरकारनेच जाणीवपूर्वक केली कारण पाकिस्तान सरकारला भीती होती कि भारत आता पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करेल म्हणून त्यानी हे माघारीच पाऊल उचलल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
Read Also :
आरक्षण हे जातींच्या लोकसंख्येनुसार मिळायला हवं, मुख्यमंत्री नितीश कुमारांची मागणीhttps://t.co/mblSmylapa @BJP4Maharashtra @NitishKumar @RamdasAthawale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020