नेतृत्व निवडीच्या बैठीमध्ये राहुल गांधी यांनीअनेक नेत्यांना फटकारलं व भाजपासोबत संगनमत केल्याचा आरोप केला.त्यामुळॆ बैठकीनंतर अनेक मोठे नेते राहुल गांधींवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत राहुल गांधींवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मात्र लगेचच त्यांनी ते ट्विट डिलीट करत पुन्हा दुसरे ट्विट केले.
सिब्बल यांनी केलं होत ‘हे’ ट्विट डिलीट
आम्ही भाजपाशी संगनमत केलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
मग राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली.
मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली.
गेल्या 30 वर्षांमध्ये भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान मी केलेलं नाही.
तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,’
अशा शब्दांमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली आहे.
असे होते डिलीट केलेलं ट्विट
मात्र त्यानंतर सिब्बल यांनी आपले ट्विट डिलिट करत सारवासारव केली आणि पुन्हा नवे ट्विट केले.
काय म्हणालेत सिब्बल नव्या ट्विटमध्ये
‘राहुल गांधी यांनी थेट माझ्याशी संवाद साधला आहे.
माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं विधान आपण केलंच नसल्याचं ते म्हणाले आहेत.
त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे,’
Was informed by Rahul Gandhi personally that he never said what was attributed to him .
I therefore withdraw my tweet .
— Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020