मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर कायम आहे. दिवाळीनंतर तर कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद करू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत विचार करत आहे. सूत्रांचा हवाला देत काही वृत्तवाहिन्यांनी ‘दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद होणार’ या मथळ्याखाली वृत प्रकाशित केलं.
मात्र, या वृत्तात काहीही तथ्य नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्लीतून महाराष्ट्र येणारी रेल्वे अणि विमानसेवा काही काळ बंद करावी का? असा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. या बाबत कोणाताही पत्र व्यवहार दिल्ली केंद्र सरकारसोबत केलेला नाही, असं मुख्य सचिवांनी माहिती दिली आहे.
दुसरीकडे, विमानन मंत्रालयायाकडूनही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद करण्याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयानंही रेल्वे सेवा बंद करण्याबाबत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दिल्लीत कोरोना व्हायरसचा कहर झपाट्यानं वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 7,546 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या 5,10,630 झाली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत एकट्या दिल्ली कोरोनानं 98 जणांचा बळी घेतला आहे. एकूण मृतांची संख्या 8000 वर पोहोचली आहे. तर 6658 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Read Also :
भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला ; आशिष शेलारांचा सेनेवर हल्लबोल
31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार मुंबईतील शाळा; आयुक्तांचा निर्णय
“आता लवकरच महाराष्ट्रातही सत्तांतर होऊन राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल”