नवी दिल्ली : ‘कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. सरकारने कोरोनाविरोधात जी तातडीने पावलं उचलली त्यामुळे भारतात कोरोनाचा वेग मंदावण्यास मदत झाली आहे., असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे.
लोकसभेत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. सरकारने कोरोनाविरोधात जी तातडीने पावलं उचलली त्यामुळे भारतात कोरोनाचा वेग मंदावण्यास मदत झाली आहे. याशिवाय कोरोनाचे अधिक रूग्ण हे महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, युपी, पश्चिम बंगाल तसंच नवी दिल्लीमध्ये आहेत.’
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, गेल्या 24 तासांमध्ये 77,512 लोकं कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे देशभरात एकूण रूग्ण बरं होण्याची संख्या 37,80,107 इतकी झाली आहे. तर 60 टक्क्यांपेक्षा जास्त नवीन प्रकरणं ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून येत आहेत