फलटण : आळंदी-फलटण-पंढरपूर असा 250 किलोमीटरचा विस्तारित पालखी महामार्ग मंजूर झाला असून, यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे प्रक्रियेमध्ये दिला जाणारा जमिनीच्या मोबदल्यामध्ये भेदभाव केला जात आहे. माळशिरस तालुक्यात एक गुंठा जमिनीला एक लाख रुपये दर, तर तिथूनच 100 मीटरवर चार लाख रुपये दर दिला जात आहे असा आरोप खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात पालखी मार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना नगरपंचायत जमिनीला एक दर व त्याच्याजवळ 100 मीटरवर असणाऱ्या जमिनीस जादा मोबदला मिळत आहे. हा भेदभाव कशासाठी, याची चौकशी करावी तसेच महामार्ग निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.
मोबदल्यामधील भेदभाव मिटवून सर्व शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा, असे स्पष्ट करून महामार्ग निर्मिती प्रक्रियेत सांगोला, माढा, करमाळा येथील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी संसदेत केली.
माढा मतदारसंघात माळशिरस परिसरातील शेतकरी बांधवांना अधिग्रहण प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नाही. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी खासदार निंबाळकर यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थांकडून होत होत्या. त्या संदर्भातच आज लोकसभेत खासदार निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.
Read Also
MPSC पास झालेल्या ‘त्या’ उमेदवारांना नियुक्ती द्या !https://t.co/SzVVItZZ3I#RohitPawar #DattatrayBharane #ncpol
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020