No Result
View All Result
मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मागील काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली संदर्भात आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ घडून आली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेवरूनही त्यांनी सडेतोड भूमिका घेत यंत्रणांवर टीका केली आहे.
कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय देशमुखांना ताब्यात घेणं ही मनमानी आणि विकृत तानशाही असल्याचं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांनी तुरुंगात पाठवू अशी भाषा भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत. कोणत्याही मंत्र्यांची नावे घेऊन वायफळ बडबड करतात. तुरुंगांत पाठवणार म्हणजे ते काय असा ? सवाल देखील उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊतांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर देखील सामनाच्या अग्रलेखातून मत मांडले आहे. राऊत म्हणाले राज्याचे माजी गृहमंत्री हे ईडीच्या ताब्यात आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग या अधिकाऱ्याने कर्तव्यदक्ष असणाऱ्या गृहमंत्र्यांवर हवेत बार उडवले आणि काहीही उलट सुलट आरोप केले.
त्या आरोपांवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढल्या २४ तासात हेच परमबीर सिंग फक्त पळूनच जात नाहीतर आरोपही नाकारतात अशा शब्दात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.
यापुढे महाराष्ट्रात अशी कोणतीही घटना घडली तरी आम्ही अजिबातच खपवून घेणार नाही. अनिल देशमुखांची पुरावे नसताना बदनामी आणि अटक केली जाते आणि भारतीय जनता पक्ष त्याबद्दल जल्लोष करते. ही विकृत तानशाही आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत केंद्रीय तपास यंत्रणांचा हा अतिरेक खपवून घेतला जात आहे असं ते म्हणाले आहेत.
No Result
View All Result