मुंबई : केंद्रात भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर करुन विविध क्षेत्रांतील नामांकित आणि दिग्गज व्यक्तींच्या बदनामीच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सोशल मीडियावरुन विशेषकरुन राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या बदनामी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. विविध क्षेत्रातल्या नामांकित आणि दिग्गज व्यक्तींना बदनाम करण्यासाठी अनेक अॅपचा वापर करण्यात येऊ लागला आहे”, असं शेख म्हणाले. अनेक अॅप्सचा वापर कोणत्याही सन्माननीय व्यक्तीबद्दल बदनामी करण्यासाठी तसंच समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करताना समाज विघातक लोक दिसतात. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.
अनेक वेळा अनेक दिग्गज लोकांना ट्रोल केलं जातं किंवा एखाद्या भूमिकेवरुन त्यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत समाजमाध्यमांवर लिहिलं जातं. अशा घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. अनेक वेळा अनेक दिग्गज मान्यवरांनी देखील याविरोधात आवाज उठवला आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
Read Also :
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा: शिवसेना नेते संजय राऊतhttps://t.co/MICsi9XvRb @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020